LIVE
मुंबई

वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य; उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी जखमी वारकऱ्यांची घेतली भेट, प्रशासनाला दिले तातडीचे आदेश

जेजुरीजवळील पालखी मार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत जखमी वारकऱ्यांची भेट घेतली. उपचारात कोणतीही हलगर्जी होऊ नये, असे निर्देश देत प्रशासनाला आवश्यक मदत तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य; उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी जखमी वारकऱ्यांची घेतली भेट, प्रशासनाला दिले तातडीचे आदेश

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान जेजुरीजवळील बेलसर फाटा परिसरात वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव ट्रक घुसून झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक वारकरी जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी तात्काळ दखल घेत जेजुरी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. जखमी वारकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच कुटुंबीयांना धीर देत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला.

रुग्णालयात डॉक्टर, आरोग्य अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा करत सुनेत्रावहिनी पवार यांनी प्रत्येक जखमीवर सर्वोत्तम उपचार करण्यात यावेत, उपचारात कोणतीही हलगर्जी होऊ नये तसेच आवश्यक औषधे, तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश दिले.

दुर्घटनेतील जखमी वारकऱ्यांना आवश्यक ती सर्व शासकीय मदत, आर्थिक सहाय्य आणि वैद्यकीय सुविधा त्वरित मिळाव्यात, यासाठी संबंधित प्रशासनाने समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. गंभीर जखमी वारकऱ्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.

या दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त करत सुनेत्रावहिनी पवार म्हणाल्या की, वारकरी ही महाराष्ट्राच्या संत परंपरेची ओळख असून त्यांच्या सुरक्षिततेला शासन सर्वोच्च प्राधान्य देत आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पालखी मार्गावरील सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा सखोल आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.

दरम्यान, अपघाताची चौकशी सुरू असून संबंधित जबाबदारांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनेमुळे पालखी सोहळ्यावर शोककळा पसरली असून राज्यभरातून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली आणि जखमींच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.

Share करा:

संबंधित बातम्या

कृषी विकासाला नवसंजीवनी देणार; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा शेतकरी सक्षमीकरणावर भर

02 Jul 2026

लोकल प्रवाशांनो सावधान! विनातिकीट प्रवास आता महागात; रेल्वेचे नवे नियम लागू, दंड थेट दुप्पट

01 Jul 2026

आसाममध्ये महापुराचा तडाखा! रेल्वे संपर्क खंडित, हजारो कुटुंबांचे स्थलांतर; जनजीवन विस्कळीत

01 Jul 2026

इंग्रजी, CBSE, ICSE असो वा राज्य मंडळ; मराठी शिकवणे आता बंधनकारक

30 Jun 2026
📱 WHATSAPP वर मिळवा
दर तासाला ताज्या बातम्या
Join करा →